Breaking News
Loading...
Tuesday, 15 December 2009

Info Post


तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!   
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!

माणुसच आज माणसाला मारायला उठलायं,
हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?
हे माणसा परतून माणसात ये,
सोडून द्वेश, हर्षात ये!

तस पाहिलं तर,
तिची माझी सच्ची मैत्री होती..
आज कित्येक वर्षानी भेटलो,
माझी सारखीच तिही कोणा एकासाठी एकटी होती !!

सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं...
बदलत राहिले दिवस तरीही, 
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!

शब्द मोत्यांसारखे असतात
म्हणून कसेही माळायचे नसतात....    

शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ  सांडायचे नसतात!!

 

मी पाहिलय तुला
मला सोडुन् जाताना....
स्वत:च्या डोल्यातुन
तुला वाह्ताना.....

स्वतःच्या परिनं जिवन जगण्याची
इथे प्रत्येकास संधी नसते
प्रत्येक झाडाच्या नियती
हिरवीगार फांदी नसते

नदीकाठी माझं घर
प्रत्येकाचा आरडा ओरडा आहे
कसं सांगू मी त्यांना,
माझा घसा किती कोरडा आहे


पापाचा घडा भरला आहे पण,
निर्वाणीचा दूर आहे तो क्षण,
देवंही आता गप्प बसलाय,
नऊ अवतारां नंतर धास्तावलाय !!!!

समाजाला काही,
स्त्री पुरूष समानता रुजली नाही,
रामाच्याही सीतेला
अग्नी परीक्षा चुकली नाही!!!!

 

बुडल्यावर दुःखात,
माणसांची पाठ फिरली.
माणूसच काय .... पण अंधारात
सावलीनेही साथ सोडली.
 

देवाला देवत्व देतो
त्याचे विसर्जनहि करतो
एवढा महान माणूस
कधीकधी आत्महत्याहि करतो


भावना अन् वस्तुस्थिती

यात छोटी गफलत असते,

मनाच्या प्रांगणात

भावनाच वस्तुस्थिति असते.

 

हरलेला डाव ऱागाने पुन्हा मांडू नये
खेळण्यांनी खेळण्यांशी हें असें भांडू नये
सोसतांना ती कशी तृप्तीत सोसावी व्यथा
आसवांची बात न्यारी, पण स्व:ता सांडू नये 


0 comments:

Post a Comment