Breaking News
Loading...
Saturday, 17 December 2011

Info Post
पहिला मित्र : एक प्रश्न विचारू?

दुसरा मित्र : हा विचार ना?

पहिला मित्र : समज जर तुला असे कळले कि,
तुझ्याकडे जगण्यासाठी आता फक्त एकाच क्षण उरलाय.
आणि या क्षणात तू कोणत्याही पण फक्त एकाच आवडत्या व्यक्तीला भेटू शकतोस, तर तू कुणाला भेटशील?

दुसरा मित्र : अअअअअअ......
असे असेल तर मी त्या क्षणात कोणालाच भेटणार नाही....

पहिला मित्र : असे का?सांगशील?

दुसरा मित्र : सांगतो ना.....
हे बघ,
जर मी तुला म्हटले कि,मी त्या क्षणात माझ्या आईवडिलांना भेटेन.
तर तू म्हणशील कि,फक्त एकालाच भेटायचं......एकतर आई नाहीतर बाबा....एकाचच नाव सांग
मग मी म्हणेन कि,"आईला भेटेन,खूप प्रेम आहे तिचे माझ्यावर...."
मग तू म्हणशील,"म्हणजे तुला असे म्हणायचेय का कि तुझ्या बाबांचे तुझ्यावर प्रेम नाही....
अरे ते दाखवत नाहीत पण आई एवढीच त्यांना पण तुझी तितकीच काळजी आहे...
मग मी पुन्हा कोड्यात पडेन आणि म्हणेन कि,ठीक आहे मग मी त्या क्षणात माझ्या बाबांना भेटेन.
मग तुझा पुढचा प्रश्न असेल कि,"आई वडिलांचे नाव घेतलेस,पण तुझ्या प्रेयसीचे नाव नाही घेतलेस.
ती पण इतकी प्रेम करते तुझ्यावर.तिला भेटावेसे नाही वाटणार का?"
मग मी पुन्हा कोड्यात पडेन.
पण खरे सांगायचे तर
नात्यांमध्ये असा क्रम नाही लावता येत,
हे नाते आधी आणि ते नाते नंतर.......
मला जरासा क्षण मिळाला तर मी कोणालाच प्रत्त्यक्ष कोणालाच भेटणार नाही
त्या क्षणात मी माझे डोळे बंद करून घेईन आणि
माझ्या सगळ्या आवडत्या व्यक्तींना मनातल्या मनात आठवेन...माझी आई,बाबा,ती आणि माझे मित्र मैत्रींनी........आणि सगळेच
कारण
तो यम माझ्या त्या शेवटच्या क्षणावर ताबा ठेवू शकतो
पण माझ्या मनावर नाही"......... :)

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

0 comments:

Post a Comment